Wednesday, January 31, 2007

तु नसतेस तेंव्हा काय होते







तु नसतेस तेंव्हा काय होते
मनाचं हलक पिस होते
वारयावरून अलगद उडत
तुझ्याकडेच धाव घेत

नघतेस तेव्हातुझा हळुवार स्पर्श असतो सोबत
तुझा मधुर आवाजसतत माझ्या कानात घुमत
तोतु नसतेस तेंव्हा डोळेतुझीच् आतुरतेने वाट पाहातात
तु येण्या अगोदर तुझ्या आठवणी धावत येतात

तु नसतेस तेंव्हा असाच मि शांत असतो
गहिरया काळ्या डोळ्यांमध्येमाझे आभाळ शोधत असतो
बरसणारया त्या नभांमध्येमाझा चंद्र शोधत असतो
तु नसतेस तेंव्हाकाय काय सांगु काय काय होतं

मनातला पारिजात बहरत नाही
अंतःकरणात मोर नाचत नाही
अंगावर चांदणे बरसत नाही
रातराणीचा सुगंध दरवळत नाही

विसरतात शब्द आपला अर्थ
जिवन होते माझे तुझ्यविना व्यर्थ
तु जवळ नाही असे कधीच होत नाही
तु जवळ नसलीस तरीतुझी आठवण जात नाही

तुझी आठवण मनात नसेलातेंव्हा मी कदाचित ह्या जगात नसेन



-तुमचाचॐकार

No comments:

Post a Comment