Tuesday, September 22, 2009

कल्लोळ.....


प्रश्नांत गुंतलेले प्रश्न
नुसताच काहुर उठवणारे
-हुद्याचा वेध घेणारे
अन....
मनावर सतत घोंघावणारी वादळे ...
एकामागुन एक.... मनावर धडकणारी वादळे....
वादळांपुर्वीची वा नंतरची ति भयाण शांतता कुठेतरी हरवलेली....
अन तितक्यात त्या भयाण शांततेचा पदर चिरत ऐकु येणारी एक आर्त किंकाळी
कोणाची? काय ठाऊक ?
कोणीतरी विव्हळतयं ? रडतयं ....
मरतयं ?
पण कोण ते? कोणास ठाऊक....
का रडतेय ते? कोणासाठी ?
मन असावं ते ... असलंच तर ते कोणाचं?
काय माहीत ? का हा सारा खटाटोप......
डोळ्यांत दाटणारं पाणी....
अन अलगद तुटणारा बंध..
मनाचा मनाशी...
अन निर्मीलेला अन अनाहुत बंध...
कधीही न शमणारा मनाचा वेध घेणारा...
कोणाच्याही नकळत मारणारा...
फक्त कल्लोळ.....

No comments:

Post a Comment