तु रुसायचं ,अकारणच भांडायचं
हसायचं ,एकमेकांना समजवायचं
आपलं नातं अगदी असचं जपायचं
सोबतीने..अगदी सारं शिकायचं
एकमेकांसाठी जगत राहायचं
स्वप्नांना...मुर्त रुप दयायचं
स्वप्नांच्या दुनियेत रंगुन जायचं
आयुष्याचं पान नव्यानेच लिहायचं
पानावर...असेल नविन अध्याय...
पावलाला लाभेल पुर्णत्वाचा न्याय...
श्वासांगणीक ध्येयाच्या जवळ जायचं
नव्या जगाला उमेदीने सामोरं जायचं
तु असचं हसत राहायचं
मी तुला बघत राहायचं
आयुष्यातलं चुकार वळण
सहजच मागे टाकायचं
अन मग तुझ्या अदांना
मी सहज..कवितांत गुंतवुन टाकायचं
ओंकार
nice
ReplyDeletefaar sundar ahe kavita.....
ReplyDelete