Thursday, March 22, 2007

माझं मन पुन्हा तिच चुक करतं..........


कधी कधी मी माझ्या आयुष्याचा विचार करतो
सारे दुःख विसरुन मग भुतकाळात प्रवेश करतो


जुन्या आठवणींचा मग माग घेऊ लागतो
आणी मग वर्तमानातील हेवे दावे विसरतो


चांगले क्षण आठवले की मनातुन सुखावतो
आणी मग त्या क्षणांच्या आकाशामध्ये विहरतो


त्यावेळी मन माझं भावनावश होतं
आणी मग झालेल्या चुकांची आठवण करु लागतं


कधी कधी मन माझं नभ बनून बरसतं
कधी कधी ते डोळ्यांवाटे ओघळतं


बघणारयांना ते वरुन फक्त पाणी जरी वाटतं
तरी ते माझ्या तुटलेल्या मनाचं प्रतीबिंबच असतं


ना जाणे काय अचानक मन असं का दाटतं
मग त्या आठवणींच्या गर्तेत अजुन फसत जातं


मग कसाबसं ते त्यातुन बाहेर पडतं
पुन्हा असं करायचं नाही हे दरवेळी ठरवतं


पुन्हापुन्हा मन माझं तिच चुक करतं
का जाणे मन माझं मला असं का फसवतं


कसे बसे रडत रडत मग ते सावरतं
काव्य बनुन तेच सुखः दुःख मग कागदावर उतरतं


ते काव्य माझ तुम्हाला मात्र सुखावतं
आपणही करायला पाहीजे काव्य असं तुम्हालाही कधी वाटतं


जरुर करा कवीता जरुर बना कवी
व्यक्त करा भावना नाही बोलणार कुणी
पण ठेवा ध्यानात एक नाही सांगणार कुणी


कवी नाही फक्त सुखे भोगणारा
तर तो आहे दुःखरूपी विष घशात् ओतुन पचवणारा
स्वतः असला दुःखी तरी बाकीच्यांना ह्सवणारा
व व्यक्त करुन आपल्या भावना तुमच्या पर्यंत पोहोचवणारा
ओंकार(ओम)

Saturday, March 17, 2007

पुन्हा एकदा........




पुन्हा एकदा....ह्या कवीतेतुन कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतु नाही तुमचे ह्या बाबतीतले विचार प्लिज मला रिप्लाय करा.

आजकालचे राजकारणी साले असेच खेळ खेळतात,
दुसरयाच्या खांद्यावर बंदुक ठेवुन आपल्यावरच वार करतात,
गरीबांच्या जिवावरच ते निवडणुका लढवतात,
निवडुन आल्यावर मात्र आपल्यावरच पलटतात.

निवडुन यायच्या आधी त्यांना मायबाप बोलतात,
निवडुन आल्यावर त्यांच्याच जिवावरच उठतात,
वेगवेगळी नाटके करुन पैसा फक्त लाटतात ,
समाजसेवेचे व्रत घेऊन पैसा फक्त खातात,
समोर आल्यावर पैसा जनतेला विसरतात.

वेगवेगळ्या नावाने अनेक धंदे करतात,
पकडले गेल्यानंतर फक्त हॉस्पीटलचा रस्ता धरतात,
पकडायच्या आधी जे हट्टे खट्टे असतात,
त्यानंतर आजारीपणाच्या नावाखाली जामीनीवर सुटतात.

चारा ,धान्य अगदी शवपेट्यांचे घोटाळे करतात,
सगळा माल पचवुन मग सुखाची ढेकरही देतात,
आपण मोकाट सुटुन मग निरपराधांना त्यामध्ये फसवतात,
स्वतःहा एसी गाडीत बसुन ते फक्त इंटरव्यु देतात.

सरावलेले चोर साले ते मग चौकशीचे आदेश देतात,
आता अजुन काय बाकी ह्याचाच विचार करतात,
प्रत्येक महीन्याला काहीतरी नवीन बातमी पसरवतात,
मोर्चे काढयला लावुन जनतेची दिशाभुल सहज करतात.

मागेपुढे न पाहाता पोलीसांना लाठीचार्जचा आदेश देतात,
नंतर विचारपुस करुन जखमींची सहानभुतीही मिळवतात,
जनतेच्या डोळ्यांत किती सहजतेने धुळ फेकतात,
हे साले भामटे स्वतःला राजकारणी म्हणवतात.

विकासाच्या नावाखाली सगळे मते मागतात,
आपल्या घराचा विकास करुन देश विकायला लावतात,
कर्जे घेऊन भरमसाठ ति तशीच ठेवतात,
शेतकरयांना पँकेजेचे म्रुगजळ दाखवत राहातात.

निवडणुकीच्या वेळी तर मोठा चमत्कारच करतात,
जिंकुन आलो तर हे करीन ते करीन असे सांगतात,
जिंकेले तर सारे सहजपणे विसरुन जातात,
हरले तर विरोधी पार्टीचा डाव घोशीत करतात.

नागरीकांवर अघोषीत सम्राटशाही करतात,
भारत आहे प्रजासत्ताक ह्याचे सर्वत्र गुणगान करतात,
पकडुन ठेवलेल्या आतंकवाद्यांची देखभाल करतात,
आणी मग आतंकवादी हल्याची निंदा करतात.

गेंड्याची कातडी आपली फार जपून ठेवतात,
आणी मग सफेद कपडे घालुन वर समाजामध्ये वावरतात,
आपल्या देशाचे नेते असे गुणी असतात,
पापे करतात अनेक आणी गंगास्नान करतात,
तेच गंगेचे पात्र साफ करण्यासाठी परत टेंडर मागवतात,
का झाली अशुध्द ह्याचा मग विचार करत बसतात.

आता खरी वेळ आलीय जनतेने आवाज उठवण्याची,
ह्या समाजाच्या किडींना दुर फेकुन देण्याची,
आठवण करा त्या स्वातंत्र लढ्याची,
अनेकांनी डेशासाठी केलेल्या प्राणार्पणाची,
चला सर्व मिळुन सुरु करु तयारी परत त्या लढ्याची,
पुरे झाली तानाशाही ह्या भारतीय गेंड्यांची,
साथ जर असेल ह्याला आपणां सर्वांची,
होईलही भारतात नांदी पुन्हा एकदा शांतीची.

तुमचाच नेहमी
ओंकार ( ओम)

रंग कवीतेचे नव्हे तर भावनांचे...............




कवीता म्हणजे ......
मनावरउमटलेले भावनांचे सुरेख प्रतिबिंब
अवचीत मिळणारा एखादा भावक्षण
स्वतःला हरवण्याचा नाजुक क्षण
भावनांच्या हिंदोळ्यांवर खेळणारे मन

जे कवीता करतात
ते आपल्या भावना त्यातुन व्यक्त करतात
कधी दुःख, कधी सुखः व्यक्त करतात
मनातले भाव ते त्या द्वारे व्यक्त करतात

कवीता असतात,नाजुक फुलासारख्या ,
फुलल्या की आनंद देणारया
सुंदर दवबिंदुंसारख्या
मनाला सहजच भावणारया ,

कवीता विचार करायला लावतात
काही थोडेफार रडायलाही लावतात
काही मने जूळवतात
काही नाती बनवतात
काही भावना व्यक्त करतात
काही रोष व्यक्त करतात
समाजातील वाईट गोष्ठींवर काही वेळा प्रहारही करतात

कवीता शब्दांपासुन सुरु होतात
व शब्दांवरतीच संपतात
पण
संपता संपता ते
आयुष्याला एक ध्येय देऊन जातात
भावनांचे रंग मनावर असे चढतात की
ते संपुर्ण आयुष्यच बदलून जातात

म्हणुनच ते रंग मला कवीतेचे नव्हे तर भावनांचेच वाटतात.........................

Thursday, March 15, 2007

उनाड कविता





वर सुर्य आहे तापला
खाली धरती तापली,
सारे उदास उदास
एक माय ती रडली.

घोटभर पाण्यासाठी
ती गावभर हिंडली,
श्रीमंताच्या दारापाशी
दोन क्षण ति थांबली.

आठवण बाळाची
तिच्या मनात दाटली,
ज्याला पाणी पाजण्यासाठी
ति गावभर हिंडली.

त्यांच्या घरात
सदाच शिमगा,
गरीबांच्या घरी मात्र
आहे फक्त वणवा.

तयांचा घरात
भरलेले माठ
तयांच्या विहीरी
भरल्या काठोकाठ,

बाळे तयांची
खेळती पाण्यासंगी
माझा तान्हुल्याची
लाही होत असेल् अंगी.

नाही मोल तयांना
त्या घोटभर पाण्याचे
तिच्या कानात गुंजले
रडणे पोटच्या गोळ्याचे,

तयांच्या शेतात पाटातुन
वाहे पाणी
तिच्या बाळाच्या
डोळ्यांत नाही पाणी.

सारया विहीरी आटल्या
नदी नालेही आटले
पावसाची वाट पाहत
डोळे आभाळी लागले,

आभाळात नाही पाणी,
धरणीत नाही पाणी,
नाही कुठेही बाकी पाणी
मग डोळ्यांतुन का वाहे पाणी

धिर करुन ति आई
त्या आईला बोलली,
तुमच्या सारखाच
माझाही कान्हा निजला आहे घरी.

थोडेसे तरी पाणी
मला मिळेल कागे माये,
पाण्यासाठी माझा राजा
माझी घरी वाट पाहे.

थोडेसे पाणी घेऊन
ति खुशीत चालली,
उचलुन घेण्यासाठी बाळा
ति माय आज धावली.

घरी जाऊन तिने
बाळास पुसले
बाळराज माझे आज गप्प का बैसले,
काय सांगेल तो तिला निरागस तो बाळ
आईच्या मायेने आज भारावुन गेला होत एक काळ.

Tuesday, March 13, 2007

मुखवटा



कुठुन आलो आपण
आयुष्य आपले भरजरी,
नको त्याच्या पाशात अडकलो
केली जिवनाची नासाडी.

किती चांगले मुखवटे
किती दिले शिव्याशाप,
वाटले होते गंगेमध्ये धुवुन जातील
आपली पापं.आपली
पापं संपली नाहीत
गंगेमध्ये धुतली नाहीत
मनामध्ये काळोख असल्याने
मने मात्र जुळली नाहीत.

दुसरयाची कधी नाही केली पर्वा
जेव्हा होता जवानीचा जोश
,आयुष्याची लाट हरवुन गेली
तेंव्हाच कशाला द्यायचा नशीबाला दोष.

चित्रगुप्ताप्रमाणे बनवत राहीलो
जमाखर्चाच्या वह्या
समजुन कोणालाही घेतले नाही
आता लागले पस्तावया

आपला शोध चालुच राहीला
कधी भावार्थ कुणा न सापडला
भेटला आणी पुन्हा हरवला
मुखवट्या आडचा मुखवटा
चेहरया आडचा चेहरा
लुप्त होतच राहीलाहोतच राहीला........

Monday, March 12, 2007

शांततेचा अंत शोधताना




ती शांतता वादळापुर्वीची,
भेटण्यापुर्वीच्या विरहाची ,
मनात दाटण्यारया भावनांची,
कधी कधी हसवणारया आठवणींची....

जशी नेहमीच असते किनारयाला साथ लाटांची,
असते रात्रीला साथ आकाशातील चंद्राची,
जशी नेहमीच असते ओढ नदीला सागराची,
जशी दुःखामागुन लागत राहाते आस मनाला सुखाची,

तशीच मनपण पाहु लागते वाट त्या आवडणारया व्यक्तीची,
तिची वाट पाहाता पाहाता अनाहुतपणे ओघळलेल्या अश्रुंची,
तेंव्हा अचानक लागु लागते चाहुल तुझ्या येण्याची......
आणी मग होणारया मनोमिलनाची..

माझ्या मनातील तुझ्या अमर अश्या स्थानाची
मी देतोय ना ग्वाही आज माझ्या प्रेमाची
"शांततेचा शोध घेताना" देशील ना गं साथ माझी....

नकळतचं.........





हे स्वप्न आहे की कल्पना,
आज काही केल्या कळेना.
कित्येक वर्ष जे स्वप्न होते माझ्या मनी,
तोच स्वप्नातील राजकुमार आज आला माझ्या जिवनी....

तो राजकुमार जिवनात माझ्या अनाहुतपणे आला,
दिवस सरु लागले तसा तो मनामध्ये घर करुन बसला,
एकमेकांना समजुन घेताना नकळतच मने जुळली,
प्रत्यक्षात त्याला भेटण्याची हुरहुर मनी लागली....

वरुन मी शांत असले तरी,मनात एक वादळ होते.....
भुतकाळातील आठवणींचे, काटे मनाला बोचत होते......
त्या सारयाला सामोरे जातमी त्याला भेटले....
माझ्या मनातील सारे भाव घाबरतचं त्याला बोलले....
आज स्वप्न माझे पुर्ण झाले,तो माझ्या सोबत होता...
सागरकिनारी सुर्य मावळताना,हातात त्याचा हात होता.....

प्रेमाचा निशीगंध बहरु लागला,
शुक्रतारा अधिक तेजाने चमकु लागला.....

पण...............

माझं मन अधीर झालं,
त्या राजकुमाराला सांगण्यासाठी
मी फक्त तुझीच आहे प्रत्येक जन्मासाठीच
फक्त तुझीच रे.............

तुझे सुखः ते माझे सुखः
तुझे दुःख ते माझं दुःख
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझी तुलाच साथ असेल

आणी...
त्याबद्दल मला एकचं हवयं देशील ना?
आयुष्य सरेपर्यंत तुझीच साथ..............

तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी




तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी कुणीतरी झरत आहे
गच्च निळ्यां आभाळात एक नभ संरत आहे
मनाचा डोह होतो आठवणींनी चिंब
त्या मनाच्या डोहतही पुन्हा तुझेच प्रतीबिंब

डोळ्यांनी का होईना आता बोलुन् घे प्रिये
तुला शब्द सुचतील तेव्हा कुठे असेन कुणास् ठाऊक?
तुला सुर सापडेल असे काहीतरी आत्ताच कर
तुल शब्द सुचती ल तेव्हा असेन नसेन कुणास् ठाऊक?

तु आहेस म्हनुन माझ्या आयुष्याला आहे अर्थ,
तु नसशिल् तर् माझे जिवन आहे व्यर्थ .
मेघानवाचुन नभामध्ये पाणी कधी जमेल् काय् ?
तुला वजा केल्या नतर माझ्यासाठी जगात काही उरेल काय् ?

डोळ्यांमध्ये वादळ आणी ह्रुदयामध्ये घाव् आहे,
त्या घावाच्या पाठीमागे वेदनेचा एक् गाव आहे.
तिथली लाल गुलाबे पाहुन सर्व माणसे फसतात्,
प्रेमामध्ये ह्या पडुन सर्व भान् विसरतात्.