Saturday, July 3, 2010

पुन्हा परत येऊ नकोस...

आता नाही आठवायचे तुला मी नेहमी ठरवतो
पण तरीही हे ठरवताना मी नकळत तुलाच आठवतो
तुझ्या सा-या आठवणी आता मला नकोश्या झाल्यात
त्या जागा जिथे आपण नेहमीच भेटायचो
त्याच वाटा जिथुन आपण नेहमी चालायचो
आभाळ दाटुन येत तेंव्हा माझे मन अजुनही दाटुन येते...
आठवते अजुनही
की तु कडाडणा-या विजेला घाबरायचीस...
खरोखर की मुददाम….
पण नकळत मला येऊन बिलगायचीस...
सगळे नकोसं वाटतेय
वाटतेय ह्या क्षणी धरणी फुटावी अन तिने अलगद मला आत घ्यावं
कारण? कारण विचारतेस?
काहीच कसं वाटत नाही तुला जाब विचारायला?
तु कोण ? अन मी कोण ?
आता आपला काय संबंध?
नातं तर कधीच तोडलंय ...
वाटाही आता वेगळ्या झाल्यात.....
आता अजुन काहीच नकोय मला
कोणाकडुनच काहीही नकोय....
बस... एकच इच्छा आहे पुन्हा परत येऊ नकोस....
आता कुठेतरी तुझ्याशिवाय जगायला शिकलोय....
माझं क्षितीज मी आता शोधलेय
त्यात रंगही भरलेत बस...
आता पुन्हा रंग विस्कटायला येऊ नकोस......
पुन्हा परत येऊ नकोस...

ओंकार

No comments:

Post a Comment