Friday, April 1, 2011

आजन्म तुझीच...

कायमच नाटक केलं..
मी सगळ्यांनाच फसवण्याचं...
आता मात्र खरचं..फसलयं...
मन एका खुळ्याचं...
चेह-यावरचा रंग खोटा...
क्षणार्धात उतरुन गेला...
तुझ्या माझ्या गोष्ठी ब-याच..
आठवांत मला देऊन गेला...
त्या जुन्या आठवांची फोलपटं.अ
आता पुन्हा एकदा ग्वाही देतायत..
मन माझं अस्थिर झालयं...
ते मलाच पटवुन देतायत्...
आता अजुन किती काळ
मी स्वतःलाच फसवत राहयचे...
अजुन किती काळ मी फक्त
स्वप्नातच इमले बांधायचे...
बंधने सारी विसरुन जा..
एकदा मला कवेत घे...
तुझ्या माझ्यातले सारं अंतर
क्षणार्धात सख्या मिटु दे..
सर्वस्व वेड्या दिलेय तुला...
मनाचं काय विचारतोस?
मी तर आहे आजन्म तुझीच...
सोडुन गेलीस तर विसरशील का मला...
असले हे प्रश्न का करतोस?
तु नेहमीच बोलायचास...
सगळे काही ठिक होईल...
सये तुझ्या आसवांचा
एक दिवस तरी अंत होईल...
माझ्यापासुन लपवुन ठेवलेस..
इतकं मोठं कारण..
श्वासच थिटे होते तुझे....
हेच होतं न तुझे मला टाळायचे कारण...
जाताजाताही वेड्या इतके सारे देऊन गेलास...
कायम इच्छीलेले ते स्वप्न माझे
सख्या पुर्ण करुन गेलास...
आजवर दाबुन ठेवलेल्या..
त्या प्रत्येक क्षणाचा...
अनुभव मला देऊन गेलास...
प्रेम कसं करावं हेच मला समजावुन गेलास..

ओंकार

No comments:

Post a Comment