Tuesday, December 27, 2011

उगाच...अगदी सहजच

स्पर्श ओझरता तो
शेवटच्या भेटीचा..
हवा हवासा वाटलेला..
तुझ्या डोळ्यांत दाटुन
तो काळही क्षणभर
त्या वळणापाशी थांबलेला.
ठरवलं होतं न?
आपण पहीलचं
की परतुन मागे नाही पाहायचं
सा-या निरोपाचं देणं घेणं
फक्त
एकाच क्षणांत उरकायचं.
पाऊलेही चालु लागलीच..
डोळे मात्र
अजुनही तिथेच..
त्याच वळणापाशी...रेंगाळत
तुझ्या पाऊलांचे ठसे शोधत..
कश्यापायी...
देवासच ठाऊक..
फलाटावरुन सुटलेली गाडी..
अन वाढलेलं अंतर.
ति दुर दुर जाणारी तुझी
पाठमोरी सावली..अन.
भरुन आलेला उर..
पुन्हा तुझ्याच आठवणींनी..
तोही उगाच...अगदी सहजच

ओंकार


No comments:

Post a Comment