Monday, August 23, 2010

गिरणी कामगार...

ह्या शब्दांतच सारे काही आले.... अस्सल मुंबईकर... जो प्रत्यक्षात कधी पाहाण्यात नाही आला पण हे मात्र खरे की मुंबई सोन्याची झाली ती ह्यांच अनामीकांमुळे... त्यांच्यासाठी.... त्यांचीच कैफीयत बहुदा अशीच असेल....


घरं आमची तोडुन मुंबई तुमची सोन्याची झाली....
आमचे संसार झाले उध्वस्थ चेह-यावरची रेषा तरी नाही हलली....
दिले कपडे आम्ही मुंबईला....
पण...
आमची पोरं मात्र तशीच राहीली....
विरलेले कपडे वापरत.......
खुप कष्ठ केले पोरांची स्वप्न पुर्ण करायची म्हणुन......
काय माहीत... 
आतातरी पडेल काय पोटात घास त्याच्या
बापाने पस्तीस वर्षांपुर्वी कोर्टात टाकलेली केस लढवुन....


तो मरायच्या आत निर्णय द्या म्हणजे झालं

No comments:

Post a Comment