Wednesday, March 26, 2008

भारतभुमी... एक सोनेकी चिडीया


भर दुपारच्या उन्हात आलयं माझ्या डोळ्यांत पाणी
कुठे सुकलेली पानं, कुठे कुस्करलेली मनं
सारं कसं अगदी ओसाड रानं भासतयं
अरे हे सारं कसं सहजपणे घडतंय
काय जाणे कुठे काय बिघडलंय?
अरे पण हे सारं कसं अश्रुंची धार लावतंय

कुठे पुराचे लोटं ,कुठे चक्क बॉंबस्फोट
कुठे पाण्याचे भास कुठे नोकरीतील त्रास
कुठे परीक्षांचा भार कुठे प्रेमात हार
ह्या सगळ्या गोष्ठीत आपलं हक्काचं मन हरवलंय
माणुसकीच्या शोधातं मन वेड्यासारखं भरकटतयं
अरे पण हे सारं कसं अश्रुंची धार लावतंय

बिघडलयं हे नक्की मग सुधारणारं कधी
दुसरा पुढे येण्याची वाट पाहणार किती
कधीतरी सगळी ही परिस्तिथी बदलायलच पाहीजे
पहीला प्रयत्न नेहमी आपणच केला पाहीजे
अस हातचे कांकण शोधण्यासाठी आरसा कशाला पाहीजे
हे सारं बदलण्यासाठी फक्त एकच सुरवात पाहीजे

आता सुरवात कशी करायची हे मला विचारु नका
दुसरयाला कमी लेखण्यात वेळ वाया घालवु नका
सगळे ठिक करण्याचा विश्वास मनात बाळगला पाहीजे
सोबत असण्यारयांची साथ पुर्ण द्यायला पाहीजे
मग पुन्हा एकदा डोळ्यांत आनंदाश्रु येतील
अन मग आपली ही भारतभुमी "सोने की चिडीया" होईल

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

No comments:

Post a Comment