Thursday, September 30, 2010

आज पुन्हा एकदा पाहीले तुला (पुर्वाध)

त्याच वळणावर... आणि पाहातच राहीलो.
कधी वाटेलही नव्हते की
तू भेटशील पुन्हा
अशीच अवचित .... नकळत
त्याच अनोळखी झालेल्या वळणावर

जिथे सुटले होते हात हातातुन..
अश्रुही अडले होते ओघळण्यावाचुन,
नात्याचे मोती विखुरले होते
अगदी अलगद माळ तुटावी तसे...

कारण काहीच नव्हते
पण तरीही नशीबी आलेला दुरावा
पुढे चालू पाहत होतो...
आपण दोघेही एक काटेरी वाट..
पण तरीही मागे वळून पाहात होतोच
वाटत होते तू कधीतरी वळशील
पण... कदाचित रस्ताच संपला होता...

कोणीतरी मागे विचारले मला
कोणी कोणाला सोडले,
मी काहीच बोललो नाही
बस...डोळ्यांतले दोन अश्रू मात्र नकळत ओघळले
न तू मला सोडले ना मी तुला....
जणू ते ठणकावुन सांगत होते
की फक्त प्रेमानेच आम्हाला सोडले होते....

Contd......

No comments:

Post a Comment