दुःख सहन करणे...आताशा...
माझ्याने जमणार..नाही...
खुप मुश्कीलीने समजावलेय मी माझ्या मनाला...
माझ्या मनाचे शल्य मी व्यक्त करुच शकणार नाही..
आठवांची गणीतं न सोडवलेलीच बरी..
त्यांचा काही नेम नसतो..
कधी हासु ...कधी आसु...
काहीच कळण्याचा मार्गच नसतो
स्वप्न तर माझीच हक्काची आहेत...
कारण ती फक्त माझी नी माझीच आहेत...
त्यांना स्वहःहुन जास्त जपतोय..
कारण
आता त्या स्वप्नांसाठीच का होईना मी जगतोय...हसतोय.
कायमसाठी..निजायला
फारसे कष्ठ पडणार नाहीत..
पण त्याने माझे
काहीच प्रश्न सुटणार नाहीत.
वाळुच्या भिंती....किना-यावर
भीती ....झेपावणा-या लाटांची..
आजकाल तशीच वाटतेय भिती..
पुन्हा स्वप्न पाहाण्याची.
तो ठसा...कायमच जपणार आहे ...मी
तुझ्या आठवांसोबत...
कारण तोच देतोय मला जगण्याची उमेद नवी..
सरत होती...जी श्वासांसोबत..
काही संदर्भ मुक्त..सोडलेलेच बरे...
काही रकाने....रिक्त..सोडलेलेच बरे...
म्हणजे....हवं ते लिहीता येतं...
मनातलं हवं तिथे...हवं तेंव्हा..
अजुनही तुझी आठवण दाटली..
की शब्द माझे मुके होतात..
कल्पनांचे रंग माझ्या...
अवचीत का फिके होतात
ओंकार
Thursday, November 4, 2010
"लगीनघाई"
प्रेम बहुधा होते माझे..
पण तिची ती "लगीनघाई
तिच्या त्या "लगीनघाई"
मागेही एक कारण होते...
ते कारण समजावेस तु..
इतकेच तिचे म्हणणे होते..
ती हसत होती...पुनवेच्या
चांदण्याराती..
पण अवसेच्या भयाण राती..
अजुनही रडते....एकांतात..
ओंकार...
ह्या कवीतेतल्या पहील्या दोन लाईन्स ह्या माझा मित्र संदीप ह्याच्या आहेत....त्याचा परवानगीने त्या रेफरंससाठी घेऊन त्यावर प्रतीसाद देण्याचा एक प्रयत्न....चुकभुल द्यावी घ्यावी....
ओंकार
पण तिची ती "लगीनघाई
तिच्या त्या "लगीनघाई"
मागेही एक कारण होते...
ते कारण समजावेस तु..
इतकेच तिचे म्हणणे होते..
ती हसत होती...पुनवेच्या
चांदण्याराती..
पण अवसेच्या भयाण राती..
अजुनही रडते....एकांतात..
ओंकार...
ह्या कवीतेतल्या पहील्या दोन लाईन्स ह्या माझा मित्र संदीप ह्याच्या आहेत....त्याचा परवानगीने त्या रेफरंससाठी घेऊन त्यावर प्रतीसाद देण्याचा एक प्रयत्न....चुकभुल द्यावी घ्यावी....
ओंकार
काय माहीत....का?
तु काळजी घेतेस...
म्हणुन कधी कधी मुददाम धडपडायला आवडतं..
तु धावत येतेस...अश्रु पुसायला..
म्हणुन कधी कधी उगाच टिपं गाळायला आवडतं
काळ्याभोर डोळ्यांची कवाडे...
अलगद उघडलीस...अन
तुझ्या डोळ्यात मी हरवुन गेलो....
त्या डोळ्यांची स्तुती..करता...
मी ही कवी बनुन गेलो.
आजही अलगद मिठीत शिरतेस...
तेंव्हा..सारं भान विसरतो..मी..
नेहमीचं ते जिणं....चौकटीतले विसरुन...
तुझ्यात स्वतःला हरवतो मी...
माझा प्रत्येक श्वास ...
एक नवी कवीता बनतो...
तुझ्याच साठी...लिहीतोय...मी..
म्हणुन तर कवीता रचत जातो..
वहीचे शेवटचं पानं...
मी नेहमीच मोकळं सोडायचो..
तुझ्या माझ्या मिलनाची स्वप्न रंगवत...
कधी तरी तुझ्यासोबत..
माझे नाव लिहीन..ह्या खुळ्या आशेवर..
प्रेम....बिम सारं झुट...
नेहमीच लोक बोलतात...
आजवर कधी पटलं नव्हतं..
अन पटेल...असंही कधी वाटलं नव्हतं
तुझे..ते रक्त...
माझं ते...लाल पाणी...
मग हाच न्याय वापरुन...
माझं प्रेम नक्कीच...
तुझ्या त्या नाटकापेक्षा...जास्त होतं
त्या गर्दीत...तुला पाठमोरं....
चालताना पाहुन...
आजही काळजात धस्स...होतं...
काय माहीत....का?
आतातर वाटाही वेगळ्या झाल्यात...
तरी पण अस होत?
गर्दीतला एकटेपणा.
बोचरा असतो...
अबोल असुनही...
खुपदा...बोलका असतो.
ओंकार..
म्हणुन कधी कधी मुददाम धडपडायला आवडतं..
तु धावत येतेस...अश्रु पुसायला..
म्हणुन कधी कधी उगाच टिपं गाळायला आवडतं
काळ्याभोर डोळ्यांची कवाडे...
अलगद उघडलीस...अन
तुझ्या डोळ्यात मी हरवुन गेलो....
त्या डोळ्यांची स्तुती..करता...
मी ही कवी बनुन गेलो.
आजही अलगद मिठीत शिरतेस...
तेंव्हा..सारं भान विसरतो..मी..
नेहमीचं ते जिणं....चौकटीतले विसरुन...
तुझ्यात स्वतःला हरवतो मी...
माझा प्रत्येक श्वास ...
एक नवी कवीता बनतो...
तुझ्याच साठी...लिहीतोय...मी..
म्हणुन तर कवीता रचत जातो..
वहीचे शेवटचं पानं...
मी नेहमीच मोकळं सोडायचो..
तुझ्या माझ्या मिलनाची स्वप्न रंगवत...
कधी तरी तुझ्यासोबत..
माझे नाव लिहीन..ह्या खुळ्या आशेवर..
प्रेम....बिम सारं झुट...
नेहमीच लोक बोलतात...
आजवर कधी पटलं नव्हतं..
अन पटेल...असंही कधी वाटलं नव्हतं
तुझे..ते रक्त...
माझं ते...लाल पाणी...
मग हाच न्याय वापरुन...
माझं प्रेम नक्कीच...
तुझ्या त्या नाटकापेक्षा...जास्त होतं
त्या गर्दीत...तुला पाठमोरं....
चालताना पाहुन...
आजही काळजात धस्स...होतं...
काय माहीत....का?
आतातर वाटाही वेगळ्या झाल्यात...
तरी पण अस होत?
गर्दीतला एकटेपणा.
बोचरा असतो...
अबोल असुनही...
खुपदा...बोलका असतो.
ओंकार..
कातर त्या राती .
अश्याच एका संध्याकाळी ...
एकांताची...वेळ...
अन समोर तु...
बोलकी असुनही ...अबोल...
बरेच काही ओठांमागे दडवत...
ती रात्र तशीच खुळी होती...
तुझ्या आठवांत ओली होती...
थोडीशी कातर.....
मुक्त उधळलेल्या चांदण्यांप्रमाणे...
आकाशाची शाल पांघरत..
कातर त्या राती ..
चमकता प्रत्येक काजवा मीच होतो...
तुझ्या माझ्या मिलनाचे..
मिलनगीत सजवत....
कोसळता तारा देखील मीच होतो.
ओंकार...
एकांताची...वेळ...
अन समोर तु...
बोलकी असुनही ...अबोल...
बरेच काही ओठांमागे दडवत...
ती रात्र तशीच खुळी होती...
तुझ्या आठवांत ओली होती...
थोडीशी कातर.....
मुक्त उधळलेल्या चांदण्यांप्रमाणे...
आकाशाची शाल पांघरत..
कातर त्या राती ..
चमकता प्रत्येक काजवा मीच होतो...
तुझ्या माझ्या मिलनाचे..
मिलनगीत सजवत....
कोसळता तारा देखील मीच होतो.
ओंकार...
नकळत
हवीहवीशी माणसं
नकळत दुर निघुन जातात
त्यांच्याशिवाय जगण्याचं
शिकवुन जातात..
आपण बसतो...उगाच
रडत...त्या विरहात...
ते मात्र आपल्या जगण्यावर
आस लावुन जातात.
जे आपल्यापासुन दुर गेलेत...
ते कधी आपले नव्हतेच..
जे आहेत सोबत...
तेच आपले हक्काचे..
तेच देतील साथ
शेवटच्या क्षणापर्यंत.
जिवाचे जिवलग
मोठ्या नशीबाने मिळतात...
समुद्राचे मौसमी वारे...
फक्त हंगामी असतात..
ते येतात नी निघुनही जातात...
पण जे तुझे हक्काचे असतात...
ते वादळातही घट्ट धरुन राहातात.
चुक कोणाची..
समजुत कोण घालणार..
सगळेच ताठ मानेचे..
कोण मान झुकवणार.
रथचक्र..आपण...
सारथीही आपणच...
वेगही आपलाच..
अन बंध ही आपलेच..
सारे मनाचे खेळ.
प्रत्येकाचा त्या आयुष्याच्या
रंगमंचावरचा रोल ठरलेला आहे...
तेवढी भुमीका वटल्याशिवाय
जाता येत नाही..
ती भुमीका संपली..की तिथे
राहाताही येत नाही...
बस...हेच सत्य आहे...
शल्य प्रत्येकानेच उरी बाळगलेलं..
एकटेपणाचं विष...ज्याने त्याने...
कोळुन प्यालेलं...
असच एकटेपणी जगाताना...
कधी ना कधी...
ज्याचं त्याचं मन...
एकांतात कोसळलेलं
ओंकार...
नकळत दुर निघुन जातात
त्यांच्याशिवाय जगण्याचं
शिकवुन जातात..
आपण बसतो...उगाच
रडत...त्या विरहात...
ते मात्र आपल्या जगण्यावर
आस लावुन जातात.
जे आपल्यापासुन दुर गेलेत...
ते कधी आपले नव्हतेच..
जे आहेत सोबत...
तेच आपले हक्काचे..
तेच देतील साथ
शेवटच्या क्षणापर्यंत.
जिवाचे जिवलग
मोठ्या नशीबाने मिळतात...
समुद्राचे मौसमी वारे...
फक्त हंगामी असतात..
ते येतात नी निघुनही जातात...
पण जे तुझे हक्काचे असतात...
ते वादळातही घट्ट धरुन राहातात.
चुक कोणाची..
समजुत कोण घालणार..
सगळेच ताठ मानेचे..
कोण मान झुकवणार.
रथचक्र..आपण...
सारथीही आपणच...
वेगही आपलाच..
अन बंध ही आपलेच..
सारे मनाचे खेळ.
प्रत्येकाचा त्या आयुष्याच्या
रंगमंचावरचा रोल ठरलेला आहे...
तेवढी भुमीका वटल्याशिवाय
जाता येत नाही..
ती भुमीका संपली..की तिथे
राहाताही येत नाही...
बस...हेच सत्य आहे...
शल्य प्रत्येकानेच उरी बाळगलेलं..
एकटेपणाचं विष...ज्याने त्याने...
कोळुन प्यालेलं...
असच एकटेपणी जगाताना...
कधी ना कधी...
ज्याचं त्याचं मन...
एकांतात कोसळलेलं
ओंकार...
Subscribe to:
Posts (Atom)




