Thursday, July 14, 2011

शाश्वती

न्यायदेवते...
तुझ्या डोळ्यावरची पट्टी लवकर उतरव...
ह्या साल्यांना अशी भर चौकात शिक्षा कर
की पुन्हा मुंबईकडे बघण्याची हिंमतच व्हायला नको...
सालं...नेहमीच झालयं...
की कधी कुठे बॉब फुटेल
अन विझवुन टाकेल आयुष्याची वात...
सारेच भयानक...
अन डोळ्यांसमोर दाटलेलं तांडव...
कोणाचे आयुष्य संपवलेले....
कोणाचे लचके तुटलेले..
ह्या साल्यांना नक्की साधायचयं तरी काय...
कोणी सांगेल का?
नक्की अजुन हवय त्यांना काय?...
सकाळी कामाला बाहेर पडणा-याच्या जिवाची..
का स्वतःला परत येण्याची शाश्वती नाही..
का? इतका स्वस्त झालयं मरणं...
आयुष्यापेक्षा...जे फुकटात वाटले जातेय...
खरचं सांगु
तर अजुनही हात थरथरतायत....
आज संध्याकाळची मिटींग होती दादरला...
जाणार होतो...
जिथे स्फोट झाला
त्याच्या बाजुच्या बिल्डींग मध्ये
पण..काल संध्याकाळी अचानक..
काय मनात आले...
की घरी आलेला परत गेलो..
अन काम करुन आलो..
का?
कारण त्या सिध्दीविनायकालाच माहीत.....

ओंकार

No comments:

Post a Comment