Thursday, November 4, 2010

नकळत

हवीहवीशी माणसं
नकळत दुर निघुन जातात
त्यांच्याशिवाय जगण्याचं
शिकवुन जातात..
आपण बसतो...उगाच
रडत...त्या विरहात...
ते मात्र आपल्या जगण्यावर
आस लावुन जातात.
जे आपल्यापासुन दुर गेलेत...
ते कधी आपले नव्हतेच..
जे आहेत सोबत...
तेच आपले हक्काचे..
तेच देतील साथ
शेवटच्या क्षणापर्यंत.
जिवाचे जिवलग
मोठ्या नशीबाने मिळतात...
समुद्राचे मौसमी वारे...
फक्त हंगामी असतात..
ते येतात नी निघुनही जातात...
पण जे तुझे हक्काचे असतात...
ते वादळातही घट्ट धरुन राहातात.
चुक कोणाची..
समजुत कोण घालणार..
सगळेच ताठ मानेचे..
कोण मान झुकवणार.
रथचक्र..आपण...
सारथीही आपणच...
वेगही आपलाच..
अन बंध ही आपलेच..
सारे मनाचे खेळ.
प्रत्येकाचा त्या आयुष्याच्या
रंगमंचावरचा रोल ठरलेला आहे...
तेवढी भुमीका वटल्याशिवाय
जाता येत नाही..
ती भुमीका संपली..की तिथे
राहाताही येत नाही...
बस...हेच सत्य आहे...
शल्य प्रत्येकानेच उरी बाळगलेलं..
एकटेपणाचं विष...ज्याने त्याने...
कोळुन प्यालेलं...
असच एकटेपणी जगाताना...
कधी ना कधी...
ज्याचं त्याचं मन...
एकांतात कोसळलेलं


ओंकार...

2 comments:

  1. kiti arthpurna ani hrudaysprashi kavita karatos re tu ........... hats of to u buddy ........ I m now big fan of ur poems ........ keep writing :)

    ReplyDelete
  2. oyee aani mi tujha kavitancha fan aahe he tula mahit aahe

    ReplyDelete