Saturday, June 21, 2008

शिवरायांचा शंभुबाळ... एक सलाम


नावात काय आहे हा शेक्सपियरचा प्रश्न छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले ह्या नावाबद्दल कुणीही विचारुच शकत नाही,ह्या नावातच सारे काही आहे. इतिहासकार, बखराकार व नाटककारांनी रंगवलेला व्यसनी, व्याभीचारी, शिवपुत्राच्या उलट गोरगरीबांच्या स्वराज्याचे स्वप्न उरी बाळगणारा, शिवरायांच्या आर्शीवादाने औरंगजेब व त्याच्या लाखो सैन्याला अवघ्या साठ सत्तर हजाराच्या सैन्यानिशी सिंहासन घोड्याच्या पाठीवर ठेवुन लढणारा, जिवात जिव असेपर्यंत एकही किल्ला किंवा एकही गलबत शत्रुच्या हाती पडु न देण्याची शप्पथ घेणारा,अवघ्या बाविस तेविसाव्या वर्षी छत्रपतीपदाची काटेरी माळ गळ्यात पडुनही जमीनीशी नाते जोडलेला, आप्तस्वकीयांनी केलेल्या दगाबाजीचा नेहमीच शिकार झालेला हा जिजाऊंचा लाडका शंभुबाळ पार निराळा होता. त्या पातशाहाने हालहाल केले तरीही खजीना व आपल्या हितचिंतकांची नावे न फोडणारा व अवघ्या बत्तीसाव्या वर्षी मरणाच्या महामंदीरात हसत हसत जाणारा हा सिंहाचा खरा खुरा सिंहाचा छावाच होता ह्या इतिहासाने वाईट ठरवलेल्या पण कर्माने महान असलेल्या त्या आपल्या शंभुराजाला त्याच्या स्वराज्यातील एका जनसामान्याचा हा एक सलाम
ओंकार(ओम)




जगन्मातेचा पोत भुत्या
रात्रभर नाचवत होता
शिवाचा छावा हा संभाजी
रणांगणे गाजवत होता
हिंदवी स्वराज्याचा नवा छत्रपती
तो शोभला होता
भगव्याची गर्दन उंच राखायला
हिरव्या चंद्रता-याशी लढला होता
सुखात निजलेल्या स्वराज्याचे
स्वप्न उरी बाळगत होता

ज्ञानी होता न्यायी होता
मनाने पक्का कवी होता
कवी कुलेशांसारखा दोस्त
त्यांनी सहजतेने जोडला होता
स्वतःवरच्या आरोपांना
नेहमीच धैर्याने सामोरे गेले
जणु प्रत्येक अनुभवांना त्यांनी
कवड्यांचा माळेत गुंफले
जिव देईन पण किल्ला देणार नाही
अशी प्रतीज्ञा केली
मराठ्यांच्या पोरांची खरी ताकद
त्या औरंग्याला कळली

शिवरायांचा शंभुबाळ आज
पाख्-याला नाचवत होता
जणु आकाशात चमकावी
विज तसा सहजतेने तळपत होता
अनेकदा स्वकीयांनी त्यांचा
जिव धोक्यात आणला
पण त्यातुनही मार्ग काढत
तो अगदी सिंहासारखा लढला
लाखो माणसे तोफा
अंगावर धावुन आले
नकळत शंभुराज्यांच्या चेह-यावर
एक मंद स्मित आले

लढता लढता शेवटी
नियतीने त्याला फसवले
घरातले अगदी जवळचेच
मांणुस शत्रुला जाऊन मिळाले
जमीमदारीचा काळा पडदा
त्यांच्या डोळ्यांवर पडला होता
हा आपला राजा त्यांच्या
डोळ्यांमद्ये खुपत होता
त्यांचा हा घात आज
अपघात बनला होता
औरंग्याचा किमॉश उतरवणारा
संभा आज शत्रुंच्या हाती पडला होता

त्या तश्या अवस्थेतही
तो बेचाळीस दिवस लढ्ला
कदाचीत स्वराज्याचा मातीच्या
खालेल्ल्या शपथेलाच जागला
काळाने झडप घातली त्यावर
तेंव्हाही नाही डगमगला
बेखौफपणे तो म्रुत्युच्या मंदीरात गेला
शेवटचे बोल निघाले मुखातुन
जगदंब जगदंब

आणी सोबत सोडुन गेले काही न सुटणारे प्रश्न..................

नेहमीच तुमचाच


ओंकार(ओम)

2 comments:

  1. Superb फारच छान

    ReplyDelete
  2. font khup lahan aahe mazya sarkhyala vachayala khup tras hoto mala he vachayala barach vel lagala pan kharach khup chhan lihil aahe ek vinanti jara font motha kar

    ReplyDelete