Wednesday, December 29, 2010

नवा डाव

बस यार.....
आता पुरे झालं...
वाद विवाद आता संपवुया....
जे ठरवलेय आपण सगळ्यांनी...
ते स्वप्नातलं विश्व,
पुन्हा सजवुया.
वाद विवाद घालुन...
कुठला प्रश्न सुटणार..
ताणुन ताणुन एक दिवस...
त्या धाग्याचे बंधही तुटणार.
ताणुन ओढुन तोडण्यापेक्षा...
थोडं समजुतीनं घेऊ...
आपल्या मनातील स्वप्नांना
आपण आता प्रत्यक्षात,
पुन्हा उतरवु
एक हात माझा...
अन दुसरा हवा तुमचा...
तरचं सजेल..सप्तरंगाने
हा गाव तुमचा आमचा.
झाली तेवढी लक्तरे...
आता पुरे झाली...
बस...आता एकच ध्येय..
तेच आपलं जग स्वप्नातलं..
तुझ्या नी माझ्या ...
मनातलं
पुन्हा लढायचं...
पुन्हा अंकुरायचं..
जगायचं..
अन बहरायचं.

ओंकार

No comments:

Post a Comment