Wednesday, October 27, 2010

उगाचच...कारणाशिवाय...

रोखुन धरलेले श्वास
अलगद निसटले...
जशी वाळु निसटते...
मुठीतुन..
स्वप्नांच्या भाराने
पापण्याही ओलावल्या...
त्यातल्या तुझ्या आठवणी...
अवचीत काठ तोडुन झेपावल्या.
आठवणी...ह्या खुळ्या असतात...
बरेच काही देऊन जातात...
काही हवेहवेसे..
काही नकोसे...
आपण सारे असे दुःखी का असतो...
प्रेमभंग झाल्यावर कवीता का करतो?
कवीता करायला काय गरज दुःखाची...
जेंव्हा नसलेल्या गोष्ठी आपण मांडु शकतो.
पैसा आणी पत हे नकळत
माणसे तोडत जातात,,,
जवळच्या माणसांनाही
दुर अचानक लोटत जातात
नांगर घेऊन फिरायची वेळ
माझ्यावर आली नाही...
तो बैलही उभा करणार नाही वा-याला मला
ही गोष्ठ नशीब तुम्हाला कोणी सांगीतली नाही.
बैल लाथ नाही
नक्कीच शिंग मारेल...
आपण बसु चारोळ्या करत...
कधी तरी तो नक्कीच वैतागेल
शेवटी तो बैलही आपल्या समोर
गुढघे टेकुन बसेल...
धन्य आहात गुरुदेव आपण
बोलुन चक्क हसेल.

ओंकार

1 comment: