Saturday, October 23, 2010

मनोगत.... काही मनातलं

वादाशी वाद घालण्याचे मी सोडुन दिलेय..
कॉंप्रमाईज करुन जगण्याचे मी सोडुन दिलेय..
निदान आतातरी आयुष्यात शांतता हवीय..
विचार करण्यासाठी स्वतःचा,
आता थोडीशी उसंत हवीय
नाराजगी तर कायमच राहील आयुष्यात..
सगळेच आपले...
सगळेच परके..
कोणावर उगाच चिडणे मला काही पटत नाही..
म्हणुन त्या नाराजगीला कवीतांव्यतिरिक्त
शक्यतो मी व्यक्त करत नाही
उगाच चिडचीड कारणाशिवाय..
मनात गोंधळ...
बाकी काहीच होत नाही..
जेंव्हा तु समोर नसतेस
असे म्हणतात की कवी जे लिहीतो
ते आधी जगतो..
कधी कधी हसतो..
एकांतात कधी रडतो
अशी वेडी माणसंच
कवीता करतात..
असलेल्या नसलेल्या सगळ्या गोष्ठी
कवीतेंमध्ये मांडतात
तिच्या त्या स्वप्नांपायीच
तडफडतोय तो..
तिला मखमलीवर चालवण्यासाठीच
काट्यांमध्ये धावतोय तो
असं बोलतात की दिव्याखाली नेहमीच
अंधार असतो..
मन पण तसेचं असते बहुतेक..
सारं काही उमगुनही बरेच काही लपवणारं


ओंकार

No comments:

Post a Comment