Sunday, October 31, 2010

घात

प्रेम तर नेहमीच सुरेख होतं...
अगदी स्वप्नांच्या पलीकडले..
तुच विचार कर मग का घडलं ते सारं..
जर होतं आपलं नातं,
व्यक्त अव्यक्तांच्या पलीकडले
खरं सांगु आता इतकं मन घट्ट केलयं..
की कोणाच साठी.....बिथरणार नाही...
आता कोणाचपायी..
माझ्या डोळ्यांतुन..
एकही थेंब सांडणार नाही.
आताशा तुझ्या आठवणींपायी
ओघळणं त्या खा-या पाण्याने सोडुन दिलं..
जाऊदे कळली असेल त्यालाही त्याची चुक..
त्याने तुझ्या आठवणींशिवाय जगण्याच शिकवुन दिलं
तुझी वाट बघता बघता..
तो अंगणातला पारीजात ही सुकला..
तुझ्या पैजण्यांच्या नादापायी...
तो काळही वाट चुकला...
अंतरे...मनामनातली...
बंधने....शब्दांशब्दांमधली...
नाती....दोन जीवांमधली...
अन ओढ ...लाट नी किना-यामधली
झ्या त्या मैफीलीत...
तुझी याद आळवली.मी...
भैरवीच्या वेळी....
पुन्हा मनांत साठवली...मी.
मिटल्या पापण्यांचा
स्वप्नांनी घात केला..
अन अबोल -हुदयाचा
तुझ्या अदांनी घात केला.

ओंकार

No comments:

Post a Comment