Sunday, October 31, 2010

महाभारत...कान्हा...अन आत्ताचा मी..II

समोर पाहुन....
गांगेयाला...
तो पार्थ थोडा भांभावला...
कान्हानेही त्याच्या मनीचा....गुंता सारा जाणीला.
रथचक्र गिळले..जमीनीने...
शाप तो...फळला...
पाहुन ते त्यासमयासी...
कर्ण सारे काही ओळखला..
त्या द्रौपदीचे सौंदर्यच
तिच्यासाठी अभिशाप बनले...
त्या महाभारतातील...
रक्तपाताचे तेही एक कारण बनले..
तो कान्हा खेळला कुटनीती...
राजनिती...पण तिही प्रेमाच्या मार्गाने...
आताचे कौरव...पांडव झुंजतात रोज..
पण कान्हाही काहीच नाही करु शकत...
कारण ऐकणेच सोडुन दिलेय..आज आपल्या मनाने..
कान्हा ही नदीतलाच...
तो गांगेयही..
अन तो कर्णही तसाच...
मग तरीही का वाहील्या.....कुरुक्षेत्रात रक्ताच्या नद्या...
त्यांचे ते नदीशी...जोडलेलं असणं पुरेसं नव्हतं का?
कान्हाने सारे बंध तोडले...
त्या पार्थाच्या नात्यांचे..
अन दिले...त्याला....दिव्यदर्शन....
अन श्रेष्ठ. ज्ञान गीतेचे....
ती गांधारी....
पतीपायी...डोळ्यावर पट्टी बांधलेली...
पण आताच्या आमच्या डोळ्यांवर कशापायी पट्टी..
डोळे उघडे ठेवुन सारं निमुटपणे सहन करणे ....
हेच कर्तव्य?
सा-या त्या धुमाकुळात..
कान्हा फक्त लढत होता...
त्याच्या इच्छेनुसार एक एक प्यादे..
त्याला हवे तसे हलवत होता..


ओंकार

No comments:

Post a Comment