Thursday, October 21, 2010

काहीसं अस्पष्ठ.......IV

सांग ना?
असे नेहमीच का होतं
आपण इतके छान वागतो..
कोणालाही त्रास होऊ नये म्हणुन तिळ तिळ तुटतो.
तरीही आपल्यासोबतच असं का नेहमी होतं
आपलं हक्काचं माणुस आपली साथ अर्धी सोडुन का जातं?
____________________________________________________________________
तु गेलीस...
जाताना डोळ्यांत पाणी देऊन गेलीस,
स्वप्नांची सा-या राख करुन गेलीस...
अन सोबत माझा प्राण घेऊन गेलीस..
____________________________________________________________________
आज नाहीतर उदया तु नक्की समोर येशील..
गोड गुलाबी ओठांनी माझे नाव घेशील..
सारं काही विसरेन मी तु मिठीत शिरशील तेंव्हा..
स्वर्ग काय तो पाहीन मी...
तुझ्यात स्वतःला हरवताना
____________________________________________________________________
तुझ्या ओठांचा ठसा अजुनही तसाच ठेवलाय मी..
तु दिलेला तो पहीला गुलाब अजुनही जपलाय मी
नाही...तुझं माझ्यावर किती प्रेम होतं ते नाही बघायचंय मला..
तु दिलेल्या प्रत्येक अश्रुची आठवण राहावी म्हणुन...
____________________________________________________________________
ते पान उघडले वहीचं
की आजही डोळे भरुन येतात..
त्या क्षणांच्या आठवांत
शब्द भरभरुन वाहु लागतात
____________________________________________________________________

ओंकार

No comments:

Post a Comment