Saturday, March 26, 2011

उनाड कविता...(रि- एडीटेड)

वर सुरीय तापला, खाली धरनी तापली,
सारं उदास उदास, एक माय ती रडली

घोटभर पान्यापायी, ती गावभर हिंडली,
पाटलाच्या दारापाशी दोन क्शन ती थांबली.

आठवण पोटच्या गोळ्याची तीया मनात दाटली,
पाजायाला पानी त्याले ती गावभर हिंडली

पाटलाच्या घरामंदी सदीचा शिमगा,
आम्हा गरीबाच्या घशात फकस्त वैशाख वणवा

पाटलाच्या घरी माठ भर पाणी रायते...
त्याची इहीर बी बरी भरली काठोकाठ.

कारट पाटलाचा खेळे बघ खेळे पाण्यामंदी
माया तान्हुल्याची मातर आग होई अंगी

नाही मोल त्याले त्या घोटभर पान्याचे
माया कानात गुंजते ते रडने पोराचे

पाटलाच्या उसात वाहे ते विहीरीचे पानी
माया बाळ्याच्या डोळ्यांतुन टिपं गळतं बी नायी..

इहीरी गावातल्या आटल्या...नदी नाले बी सुकले.
पावसाची वाट बगत डोळे आभाळी लागले..

आभाळात् नायी पानी...जमीनीत नायी पानी..
नायी कुठेबी तरीबी....डोळ्यातुन का वाहे पानी

करुन धीर ती माय पाटलीनीला बोलली...
माझा कान्हा तुझ्यापरी..तहानलेला आहे घरी

थोडं तरी पानी मला मिळेल का गे माये
पीन्यापायी पानी माझा कान्हा वाट पाहे

थोडं घेऊन पानी ती खुशीत धावली.
उचलाया बाळाला ती माय आज चालली...

घरी जाऊन तीने बाळास पुसले...
माझे तान्हुले आज गप्प कश्यापायी बसले...

काय बोलेल तीजला तो निरागस बाळ...
ओढ पाहुन आईची दाराबाहेर थांबला तो त्याचा काळ...
आज थांबला तो काळ

ओंकार

1 comment: