Monday, February 21, 2011

तुझ्यापासुन दुर गेल्यावर

उचललेलं प्रत्येक पाऊल आजचं..
तुझ्या पाठमो-या सावलीपासुन
दुर घेऊन गेलं..
मन माझं फितुर झालं...
नकळत तुझ्याचकडे राहुन गेलं...
पुन्हा प्रत्येक थेंबात साचशील तु,
कधीतरी डोळ्यातुनही वाहशील..तु...
एखाद्या कवितेतही डोकावशील तु...
दुर जाऊन माझ्यापासुन एवढी ...
माझ्या जवळ तितकीच राहाशील तु...
कधी कधी तुझ्यात
स्वतःचे अस्तित्व शोधण्याचा 
केवीलवाणा प्रयत्न करतो मी...
शोधतो...थकतो....
पुन्हा नेहमीसारखाच...
विरक्त एकटाच उरतो मी....
आता पुरे झालं...
प्रेम बीम सारं झुट...
बस यार उगाच अवास्तव
स्तोम माजलेलं...
भर उन्हात एक रान
असचं वणव्यात जळलेलं..

ओंकार

2 comments: