Monday, February 28, 2011

नेहमीच प्रश्न

आता....बरेच काही साचलेलं..
मनातलं...बोलुन मोकळं...व्हायचयं..
त्या पाण्यातले तरंगच काय...
पाणीच आता स्वतःची
ओळख हरवुन बसलेय...
बोलुन व्यक्त करुन...काही मिळेल..
काही नाही...ह्याचा
विचार करणेच सोडुन दिलेयं..
मिळेल...ती शांती...निदान
व्यक्त करुन टाकल्याची..
पण त्या नंतरही नाही सापडणार...
ती उत्तरे ...
त्यामुळे उभ्या राहीलेल्या प्रश्नांची....
प्रश्नांपासुन पाठ सोडवता सोडवता...
पुन्हा प्रश्नांतच गुंतलेला मी...
अन उत्तरे....नदीच्या त्या पैलतीरावर....
चिडवुन दाखवणारी...
रोज नवीन प्रश्न...अन रोज नवा अट्टहास...
उत्तरे शोधण्याचा
की जगण्याचा....
बघा...पुन्हा नवा प्रश्नच..
कधीकधी...आयुष्य...हे...
नकळत..प्रश्नांचा..कारखाना वाटते....
कित्तेक प्रश्न...येतात....
रोज नवीन रुपे लेवुन...
अन मी मात्र तसाच..
धीरगंभीर....उत्तरे शोधण्यात हरवलेला...
जाऊदे आता पुरे करावं...
हेच नेहमीच प्रश्न पुराण...
त्याचा..आदी न अंत...
कदाचीत...शेवटच्या श्वासांबरोबर सरतील ते....

कदाचित....

ओंकार

No comments:

Post a Comment